शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : स्थानिक न.प.मध्ये कर मालमत्तेमध्ये लागलेल्या व्याजात शासनाची अभय योजना सुरू आहे, त्यामुळे मालमत्ता करात शास्ती माफी घेत नागरिकांनी शासनाच्या अभय योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेत मालमत्ता कर भरून नगरपालिकेला सहाकर्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे यांनी केले आहे.
न.प. हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ चे कलम अ (१) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती अंशतः/पुर्णतः माफ करून कर वसुलीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे.
मालमत्ता धारकांनी शास्ती / व्याजाची रक्कम वगळून थकित रकमेचा भरणा करून २० जून २५ पर्यंत अर्ज करावा असे आवाहन न.प. मुख्याधिकारी जयश्री बोराडे काटकर यांनी केले आहे.
Social Plugin