शेगाव (प्रतिनिधी) – संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळामुळे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव शहराला अखेर बहुप्रतिक्षित अशी नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळाला आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे भाविकांसोबतच स्थानिक नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शेगावच्या धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेल्या महत्त्वाची सविस्तर माहिती देत सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि शेगावला या अत्याधुनिक गाडीचा अधिकृत थांबा मंजूर झाला.

शेगाव हे वर्षभर भक्तांनी गजबजलेले शहर असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. अशा वेळी वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळाल्याने भाविकांना जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होईल.
रेल्वे थांबा मंजूर झाल्यामुळे शेगावच्या विकासाला नवीन गती मिळेल, पर्यटन आणि व्यापारी
Social Plugin