Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

'विकसित भारताचा अमृत काळ – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ११ वर्षे' पुस्तकाचे विमोचन

 

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरु असलेल्या केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'विकसित भारताचा अमृत काळ – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ११ वर्षे' या विषयावर आधारित पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त्ते प्रकाशन करण्यात आले.
 पुस्तकातून गेल्या अकरा वर्षांत देशात घडवून आणलेले ऐतिहासिक बदल, गरिबांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजनांचा आढावा, तसेच भारताच्या सर्वांगीण विकासाचा दस्तऐवज मांडण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार,माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे, आमदार अतुल भातखळकर, भाजपा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.