Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक भारतासाठी एक प्रेरणादायी नेतृत्व


 पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांचे हे त्रिशताब्दी वर्ष आहे संपूर्ण देशभर त्या माऊलीच्या कार्याचा जागर सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर गेल्या वर्षभरापासूनच त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कामाची आजच्या पिढीला माहिती होईल अशा प्रकारच्या कामाच्या योजना आखून तशा प्रकारचे अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत . त्याची दखल देशातील अनेक राज्यांनी सुद्धा घेतलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नी त्याकाळी हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता तशाच प्रकारचा अल्पसा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने ही केला आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या लहानशा गावामध्ये मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक संपन्न झाली ते गाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी हे होय. त्या बैठकीमध्ये अहिल्यादेवी नी मंदिराचा जिर्णोद्धार केला त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील काही प्रमुख मंदिराच्या जीर्णोद्धारा  करिता 5553 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. त्यामध्ये चौंडी विकासाकरिता 681 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.               .                          



पुण्यश्लोक अहिल्यादेवी नी धर्म आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात आपले उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांच्या कर्तुत्वाला इतिहासात तोड नाही त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील दुःख बाजूला करून लोककल्याणकारी कार्याला प्राधान्य दिले होते आज भारताचा नकाशा बघितला तर अहिल्यादेवींच्या कार्याच्या पाऊल खुणा तुम्हाला देशभर दिसतील त्यांनी बांधलेल्या नदीवरच्या घाटावर अजूनही आपल्या देशातील लोक स्नानाला जातात अहिल्यादेवींनी जिर्णोद्धार केलेल्या मंदिरामध्ये आजही दर्शनासाठी रांगा लागतात धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा अजूनही थकलेल्या रंजलेल्या गांजलेल्यांना यात्रेकरूंना आश्रय देतात त्यांचे जीवन चरित्र आजही त्यांच्या कार्याच्या रूपाने जिवंत आहे अहिल्यादेवींना फक्त धार्मिक म्हणने म्हणजे त्यांच्या सत्वशील कल्याणकारी सर्व समावेशक राज्यकर्त्या प्रतिमेचा अवमान करण्यासारखाच आहे त्यांची धर्मशीलता इतकी उदात्त होती की धर्माच्या व नीतीच्या प्रत्येक बाबतीत त्यांनी आपले नाव अजरामर करून ठेवले आहे त्यांचा दानधर्म इतका प्रचंड होता की आजवर अशा प्रकारचे दानधर्म कुणीही केलेले नाही त्यांची न्यायव्यवस्था इतकी चोख होती की सावकार आणि चोर दोघेही त्यांना दुवा देत होते संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाच्या हेतूने त्यांनी केलेल्या कार्याला कधीही धर्म जात पंथ भाषा प्रदेश किंवा राज्य यांच्या भेदाच्या सीमारेषा स्पर्शही करू शकल्या नाहीत आदर्श कारभार म्हणजे अहिल्यादेवीचा भारत देशाच्या जडणघडणीमध्ये अहिल्यादेवींचा फार मोठा वाटा आहे त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशाची सेवा केली आहे भारतीय शिल्पशास्त्र साहित्य संस्कृती ही त्यांच्यामुळेच टिकून राहिली त्यांचे जीवन हे एखाद्या मंदिरासारखी पवित्र होते त्यांचे वर्तन आणि राज्यकारभाराची पद्धत त्यामुळे राज्यातील जनता त्यांना आदराने अहिल्या मा  असे म्हणत असत                  



 पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या खाजगी जहागिरीचा उपयोग संपूर्ण भारतभर दानधर्म करण्यासाठी केला नवीन मंदिरे बांधणे जीर्णोद्धार करणे घाट कुंड विहिरी तलाव धर्मशाळा अन्नक्षेत्र देवतेस अलंकार पोशाख नैवेद्य नंदादीप नित्य पूजाअर्चा अभिषेक गंगेच्या कावडी फुलासाठी बागा, आमराई, होम हवन पाणपोया,यात्रेकरूंना कपडे, घोंगळ्या भोजन अशा अनेक रूपाने हा दानधर्म अखंड आणि संपूर्ण भारतभर सुरू होते काशीला ब्रह्मपुरी ही संस्कृत पाठशाला बनवून कलकत्ता ते काशी हा रस्ता बांधून घेतला धार्मिक कार्य आणि बांधकामासाठी अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता सुरू केलेले कल्याणकारी कार्य अविरत चालू राहावे राज सत्ते पुढे वारंवार मदतीसाठी हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी त्या माऊली जमिनी वगैरेच्या माध्यमातून कायमस्वरूपी उत्पन्नाची सोय करून ठेवली होती. राज्य कोणाचीही असले तरी त्याच्या कार्याला कोणत्याच सत्ताधीशाने विरोध केला नाही  मराठ्यांचे शत्रूही त्यांच्या कार्यात अडथळे न आणता उलट शक्य ती मदतच करीत असत.



अहिल्यादेवींची प्रशासन व्यवस्था ही अत्यंत पारदर्शी व लोककल्याणकारी अशीच होती आपल्या राज्यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन कसे असावे याबद्दल त्या सदैव दक्ष होत्या विहिरी कोठे असाव्यात तरी कुठे असावी त्याप्रमाणे ती बांधून घेतली पाणी अडवीने पाणी जिरविणे यांचे त्यांना ज्ञान होते पाण्याची भूजल पातळी वाढविण्याकरता त्यांनी वने संरक्षित केली वृक्ष तोडण्यास मनाई करून नवीन वृक्ष लावावी यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मदत करून अगणित वृक्ष लावून घेतली पाणी हे जीवन आहे हे ओळखून त्यांनी तशा प्रकारचे नियोजन केले होते मॅगसेस पुरस्कार प्राप्त भूजल तज्ञ राजेंद्र सिंह जी यांनी असे मत मांडले आहे की भारताच्या ज्ञात इतिहासात पाणी व्यवस्थापनाचे तंत्र जर कोणी जाणले असेल तर ते फक्त अहिल्यादेवी होळकर यांनीच आपल्या राज्यात त्यांनी उद्योग धंद्यास प्राधान्य दिले त्याकरिता त्यांनी परराज्यातून कारागीर आणून त्यांची मदत घेतली महेश्वरला जेव्हा वस्रोद्योग सुरू केला त्यावेळी बंगाल मधून कारागीर आणले त्यांना साड्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले कुस्ती व विणकारांना प्रोत्साहन देऊन त्यांनी वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात सुरू केला आजही महेश्वरी साडी व इंदोरी साडी प्रसिद्ध आहे सुवर्णकार लोहार तांबटकार सावकार इत्यादी लोकांना त्यांनी विश्वासात घेऊन इंदोर व महेश्वर येथील बाजारपेठा भरभराटी आणल्या  त्यांना अभय असल्यामुळे व्यापार व उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली शेती उद्योगाला चालना मिळाली याकरिता त्यांनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने जमिनी उपलब्ध करून दिल्या पडीत जमिनी भिल्ल पडवी आदिवासी आदी लोकांना त्यांनी वाटून दिल्या व त्यांना पैशाची मदत केली सैन्याच्या हालचालीमुळे पिकाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई सरकारकडून केली जात होती त्याचबरोबर दुष्काळ पडला कुठे अतिवृष्टी झाली तर त्यावर्षीचा सारा माफ करून त्यांना मदत सुद्धा केली जात होती शेतकरी जगला तरच सर्व जगतील म्हणून शेतकऱ्याला कमी पडू दिलं जायचं नाही ही त्यांची निती होती.              



एक स्त्री म्हणून अहिल्यादेवी ह्या स्त्रियांच्या अन्यायाबाबत  जागरूक होत्या विधवा स्त्रियांच्या बद्दल त्यांनी काही कायदे केले होते पतीचे निधनानंतर संपत्तीचा अधिकार विधवा स्त्रीलाच मिळावा विधवेला दत्तपुत्र घेण्याचा अधिकार मिळावा तसा कायदा केला मुलीच्या वडिलांच्या संपत्तीमधील हिस्सा मागण्याचा अधिकार हुंडाबंदीचा कायदा एखादी निपुत्रिक  व्यक्ती मरण पावली तर त्यांची सर्व संपत्ती सरकारकडे जमा करण्याची त्याकाळी प्रथा होती  ती प्रथा अहिल्यादेवींनी मोडून काढली प्रत्येक स्त्रीमध्ये धैर्य  आणि विश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले सन्मानाने स्त्रियांनी आपले जीवन जगावे अशी त्यांची धारणा होती स्त्रियांची स्वतंत्र       पलटण त्यांनी तयार केली होती व त्याचे नेतृत्व स्वतःकडे घेतले होते अहिल्यादेवी परराष्ट्रनीति  वाखाण्याजोगी होती शेजारी राज्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते आपल्या राज्याच्या सीमा वाढविण्याचा आतताईपणा त्यांनी कधीच केला नाही अहिल्यादेवी चे आपण मित्र आहोत याचा अनेक राजांना अभिमान वाटत असे.


 अहिल्यादेवींनी त्याकाळी गंगेचे पाणी कावडीने निरनिराळ्या तीर्थक्षेत्री नेण्याची व्यवस्था केली होती गंगेचं पाणी हे आपणा करता पवित्र असल्यामुळे कावडीधारी लोकांच्या दर्शनाकरिता त्याकाळी लोकांची झुंबड उडत असे देशातील 45 तीर्थक्षेत्री गंगेची कावड पाठवण्याची व्यवस्था केली होती तसेच देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रावरचे पाणी सुद्धा ठिकठिकाणी पाठविण्याची व्यवस्था होती रामेश्वर येथील समुद्राचे पाणी आजही  काशीला  येत असते आणि पहिला अभिषेक विश्वनाथाच्या मंदिरामध्ये होतो आणि नंतर गंगेचा अभिषेक होतो  हे विशेष. अहिल्यादेवी संपूर्ण भारत देश हे माझे घर आहे असे समजूनच सर्व उपक्रम राबविले होते त्या लोकोत्तर स्त्रीरत्न होत्या आपल्या बुद्धिमत्तेने उदार धर्मशिलतेमुळे त्यांची इतिहासात नाव कायम केले गेलेले आहे त्यांचे इतिहासात नाव कोरले गेलेले आहे.     सम्राट अशोक यांचे मनावर कलिंगाच्या युद्धाचा परिणाम होऊन त्यांनी आपल्याला राज्यात व पर राज्यात लोककल्याणकारी कामे केली त्यानंतर अशा प्रकारची कामे करणारी किंबहुना त्याहून सरस काम करणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्याच एकमेव म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक असे म्हटले जाते आजपर्यंतच्या इतिहासात पुण्यश्लोक फक्त पाचच झाले त्यामध्ये नळ राजा, युधिष्टीर, जनक राजा, भगवान कृष्ण व अहिल्यादेवी होत. 
 पुण्यश्लोको नळोराजा  :  पुण्यश्लोको युधिष्टीर :  पुण्यश्लोको विदेहश: पुण्यश्लोक जनार्दना:                        पुण्यश्लोको अहिल्यादेवी,  होळकर कुलभूषिका :                एतानी पंचरत्नानी,  विश्ववंदनीयाच निरंतरम   .                    अशा ह्या माऊलीची आज 300 वी जयंती त्यांना विनम्र अभिवादन.                     
- श्रीराम मोतीराम पुंडे                    
 श्रीराम नगर शेगाव जि. बुलढाणा    
 मो. 82 75 0 6 36 98