Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

आदिवासी विकास खात्याचा वळवलेला निधी परत करावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन

 


संग्रामपूर (आकाश बोरसे) : सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा वळवलेला निधी परत करावा यांसाठी आज दिनांक १३ मे रोजी संग्रामपूर येथे तहसिलदार यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदकडून  निवेदन सादर केले. निवेदनामध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी वित्त विभागाने सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाचे ७४६ कोटी रुपये महिला विकास विभागाकडे वळवल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, "आदिवासी समाज हा हजारो वर्षा पासून दारिद्र्यात खितपत पडलेला समाज आहे, आदिवासींच्या विकासासाठी  दिला जाणारा निधी कमी पडतो त्यात सरकारने त्यांचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी वळवला हा आदिवासी समाजावर अन्याय आहे." असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष सोपान सोळंके म्हणाले.

"आदिवासींना उपाशी ठेऊन सरकार आपल्या फायद्यासाठी आदिवासींचा निधी दुसऱ्या योजने साठी वापरत आहे.  सरकारला आदिवासींचे दारिद्रय, बेकरी उपासमार दिसत नाही काय? असा सवाल हि जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांनी केला. त्यावेळी हुसेन काका पालकर, मंगलसिंग माणिकराव पवार, देविदास डावर, राधेश्याम खरात, रवि सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांची आणि आदवासी समाज बांधवांची उपस्थिती होती. (युवा क्रांती वृत्तसेवा)