Breaking News

युवा क्रांती न्यूज या लोकप्रिय न्यूज चॅनेल ला महाराष्ट्रात प्रतिनिधी हवे आहेत...

अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचनामे व पिक विम्याबाबत ठोस हालचाल करा – शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) :  तालुक्यातील माटरगांव, बेलुरा, बोंडगाव, चिंचखेड, गायगाव, गायगाव खुर्द, चिंचोली, सुवर्णा, शेगाव भुई, वरखेड, उमरखेड, नागझरी, हिंगणा, वैजनाथ, मोरगाव डी, खेरडा, पाळोदी, सगोडा, कालवड, डोलारखेड, वरद, तिवानं आणि बोंडगाव या गावांमध्ये मान्सूनपूर्व झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना शेगाव तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर यांच्या पुढाकाराने प्रशासनासमोर हा गंभीर प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आला. या भागातील एकूण 172.30 हेक्टर क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे 247 शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने राबवावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

रामा पाटील थारकर यांचे शेतकरीहितदायी नेतृत्व आणि संघर्षशील भूमिका शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरत आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्रशासन स्तरावर गांभीर्याने प्रतिसाद मिळत असून, नुकसानभरपाई आणि विमा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई वेगाने सुरू आहे. 

यावेळी तालुका कृषी अधिकारी चोपडे यांच्यासोबत २०२५ च्या पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. विमा कंपन्यांकडून होत असलेल्या दिरंगाईला लगाम घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी विमा भरपाई मिळावी यासाठी ठोस भूमिका घेण्यात आली. यासंदर्भात संबंधित यंत्रणेला स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

या बैठकीत शिवसेना उपतालुका प्रमुख मोहन पाटील लांजुळकर, किसान सेना उपजिल्हाप्रमुख पवन बारिंगे, भागवत उन्हाळे, गोपाल बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्थानिक नेतृत्व सातत्याने जागरूक असून, शासनाच्या लक्षात ही स्थिती आणून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.