पेनटाकळी (युवा क्रांती वृत्तसेवा) : मागील गेल्या ३५ वर्षांपासून रखडलेल्या पेनटाकळी पुनर्वसन प्रकल्पाचा अखेर निर्णायक निकाल लागला असून, मौजे पेनटाकळी गावातील ४०१ नागरिकांना हक्काचे प्लॉटचे वितरण केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजयजी रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजयजी रायमुलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश येऊन गावकऱ्यांच्या दीर्घकालीन स्वप्नपूर्तीत मोलाची भर पडली आहे.
शासनाच्या मान्यतेनंतर ७ हेक्टर ८२ आर जागेवर एकूण ४०१ भूखंड तयार करण्यात आले. नियोजित आराखड्यानुसार समाजनिहाय या प्लॉट्सचे वाटप गावकऱ्यांना करण्यात आले असून,स्वतः गावात जाऊन लाभार्थ्यांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला व समस्या दूर केल्या आहेत.
या कार्यक्रमाला आ.सिध्दार्थ खरात,तहसीलदार निलेश मडके,सहाय्यक गटविकास अधिकारी डी.एम.जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे, मंडळ अधिकारी गजानन ढोके,तलाठी सागर जायगुडे,ग्रा.पं.अधिकारीडी.बी.काळे,मोहन मगर, गजानन लहाने,जी.पी.मवाळ,संरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी,शिवसेनेचे पंजाबराव इंगळे,पुंजाजी इंगळे,भुंजगराव इंगळे,संतोष डुकरे,अमोल म्हस्के,सरपंच ,ग्रामस्थ,प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin