नवी दिल्ली ( विशेष प्रतिनिधी) : पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, ७ मे रोजी देशातील २४४ नागरिक सुरक्षा (सिव्हील डिफेन्स) जिल्ह्यांमध्ये ही मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये नागरिकांना युध्दकालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा ? याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची मॉक ड्रिल देशात १९७१ नंतर प्रथमच आयोजित होत आहे.
● या जिल्ह्यात होणार मॉक ड्रिल..
राज्यात १६ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सिन्नर, मनमाड, उरण, तारापूर, रोहा, नागाठाणे, पिंपरी चिंचवड, भुसावळ, सिधुदुर्ग, इत्यादी शहरात मॉक ड्रिल होणार आहे.
● सायरनचा आवाजः आपत, काय आहे याचा अर्थ ?
मॉक ड्रिलदरम्यान युध्दकालीन सायरन वाजवले जाणार आहेत. ही सायरन प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सतर्क करण्यासाठी वापरली जाते.
याची वैशिष्ट्ये खालीप्रमाणे..
●आवाजाची तीव्रताः १२०-१४० डेसिबल
●रेंजः २-५ किलोमीटर
●पॅटर्न: आवाज हळू-हळू वाढतो. आणि कमी होतो
●उद्देशः नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहाचण्याची सूचना देणे
●सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी काय करावे?
तातडीने सुरक्षित स्थळी पोहोचावे (५-१० मिनीटात),
घाबरू नये, खुले मैदान सोडून घर किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा.टिव्ही, रेडिओ किंवा सरकारी सूचनांचे पालन करावे.अफवांवर विश्वास ठेवू नये.
● १९७१ मध्ये झाले होते मॉक ड्रिल...
१९७१ मध्ये भारत पाकिस्तान युध्दादरम्यान देशभरात अशा मॉक ड्रिल्स आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या वेळी नागरिकांना युध्दकालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. आता पुन्हा ५४ वर्षानंतर अशा ड्रिल्सची गरज का भासली? यामागे पाकिस्तानसोबत वाढता तणाव आणि सीमावर्ती भागातील अस्थिरता कारणीभूत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
Social Plugin