नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी
हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत असतानाच भारताने मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेनंतर पाकिस्तानवर हल्लाबोल केला. भारताने सीमेवरून पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्रे डागली, असे पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ही क्षेपणास्त्रे पाकव्याप्त काश्मीर आणि देशाच्या पूर्व पंजाब प्रांतात डागण्यात आली.
हल्ल्यानंतर मुझफ्फराबादमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला. बहावलपूरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पाकने ४८ तासांसाठी सर्व हवाई वाहतुकीसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करुन हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले, भारताने बुधवारी पहाटे पाकव्याप्त काश्मिरसह पूर्व पंजाबमध्ये क्षेपणास्त्रे डागली असून आतंकवाद्यांच्या एकूण ९ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये कोटली,
मुझफ्फराबाद, बाग आणि पंजाबमधील बहावलपूर, मुरीदके येथे भारताने क्षेपणास्त्र हल्ले करून आतंकवाद्याचे अड्डे नष्ट केले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले
1. मरकझ सुभान अल्लाह बहावलपूर
२. मरकझ तैयबा, मुरीदके
३. सरजल/तेहरा कलान
४. मेहमूना जोया सुविधा, सियालकोट,
5. मरकज़ अहले हदीस बर्नाला, भिम्बर,
६. मरकझ अब्बास, कोटली,
7. मस्कर राहील शाहिद, कोटली जिल्ह्यात आहे.
8.मुझफ्फराबादमधील शवाई नाला कॅम
९. मरकज सय्यदना बिलाल
या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हवाई हल्ल्यात आतंकवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या आतंकवादी तळांमध्ये लपलेले ९० हून अधिक आतंकवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. काल रात्री (६ मे), पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफखान्यासहित गोळीबार केला. या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.
Social Plugin